breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्र

Alandi : माऊलींच्या मंदिरात प्रवेशावरून वाद, पोलीसांचा वारकऱ्यांवर लाठीमार

पुणे : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे प्रस्थान आज पंढरपूरकडे होणार आहे. वारकऱ्यांच्या टाळ मृदुंगाच्या गजरात आज पालखी प्रस्थान सोहळा पार पडणार आहे. या पालखी सोहळ्यासाठी अलंकापुरी सजली आहे. इंद्रायणीच्या काठावर हजारो वारकरी दाखल झाले आहेत. दरम्यान, मंदिरात प्रवेश करण्यावरून आळंदी येथील ज्ञानेश्वर मंदिरात पोलीसांनी वारकऱ्यांवर लाठीमार केला. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

वारकरी मंदिरात प्रवेश करताना पोलिसांशी आधी शाब्दिक चकमक झाली. त्यानंतर वारकऱ्यांनी पोलीस बंदोबस्तातील कर्मचाऱ्यांना आणि बॅरिकेट्सना लोटून देत मंदिर प्रवेशासाठी पुढे सरकले मात्र पोलिसांनी त्यांना अडवले असता त्यांच्यामध्ये पुन्हा वाद झाला. पोलिसांनी वारकऱ्यांवर लाठीचार्ज केला. यानंतर थोड्या वेळात प्रकरण शांत करण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला.

हेही वाचा – WTC Final 2023 : ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे मैदान मारलं!

४७ दिंड्यांना मंदिरात प्रवेश आहे प्रत्येक दिंडीतील ७५ वारकऱ्यांना त्यात प्रातिनिधिक स्वरूपात प्रवेश आहे. त्यामुळे मंदिराच्या बाहेर मोठा बंदोबस्त तैनात आहे. ज्या वारकऱ्यांना प्रवेश नाही, अशांनी प्रवेश देण्याचा आग्रह केला. त्यातून पोलीस आणि वारकऱ्यांच्या झटपट झाली, अशी प्राथमिक माहिती मिळत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button