2 लाखांपर्यंत कर्ज असणा-या शेतकऱ्यांनाच मिळणार कर्जमाफी…त्यापेक्षा जास्त रक्कम असणारे शेतकरी अपात्र
मुंबई | महाईन्यूज |
विधानसभा अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी महाविकास आघाडीच्या सरकारकडून शेतकऱ्यांची 2 लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफी करण्याची घोषणा करण्यात आली. मात्र आता ही कर्जमाफी फसवी असल्याचे आरोप होताना दिसत आहे. त्याचे कारण म्हणजे सरकारने केलेली कर्जमाफी फक्त 2 लाखांपर्यंत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांच मिळणार आहे. त्यापेक्षा जास्त रक्कम असलेल्या शेतकरी अपात्र राहणार आहे.
ठाकरे सरकारने केलेल्या कर्जमाफीच्या शासन निर्णयात केलेल्या उल्लेखा नुसार, राज्यातील ज्या शेतकऱ्यांच्या कर्जखात्याची मुद्दल व व्याजासह दिनांक 30 .09.2019 पर्यंत थकबाकीची रक्कम 2 लाखांपेक्षा जास्त असेल अशी कर्जखाती कर्जमुक्तीच्या लाभास पात्र ठरणार नाही, असा उल्लेख करण्यात आला आहे. मात्र यावर राज्याचे अर्थमंत्री जयंत पाटील यांनी महाराष्ट्र सरकारने हा निर्णय घेण्यामागचा उद्देश सांगितला आहे . दोन लाखांपेक्षा जास्त कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सरकारकडून वेगळा विचार सुरु आहे. सरकार त्यांनादेखील मदत करेल.तसेच ज्या शेतकऱ्यांनी नियमित कर्जफेड केली आहे, अशा शेतकऱ्यांसाठी आम्ही एक योजना आणणार आहोत. दोन लाखांपेक्षा जास्त कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या, त्यांनी घेतलेले एकूण कर्ज, आणि त्यावरील व्याजाची माहिती आम्ही गोळा करत आहोत. ज्यांचे कर्ज दोन लाखांपेक्षा जास्त आहे, आमचं सरकार त्यांनादेखील न्याय देईल. शेतकऱ्यांना हेलपाटे घालावे लागणार नाहीत, याचीदेखील काळजी घेतली जाईल.असही जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.
खऱच सरकारच्या डोक्यात दोन लाखांपेक्षा जास्त कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी वेगळा विचार सुरु असेन किंवा त्या शेतक-यांसाठी काही नविन योजना आणणार असेन तरच शेतक-यांच्या अडचणी दूर होतीलं .नाहीतर, शेतकऱ्यांवर 2 लाख किंवा त्यापेक्षा कमी कर्ज असेल त्यांनाच ह्या योजनेचा लाभ मिळेल आणि त्यापेक्षा जास्त रक्कम असलेल्या शेतकऱ्यांना मात्र या योजनेपासून वंचित रहाव लागेलं.