breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराजकारण
14 ते 17 वर्षे वयोगटातील मुली गायब झालेप्रकरणी अद्याप कोणतीही गंभीर कारवाई केलेली नाही- किरीट सोमय्या
मुंबई: भाजप नेते किरीट सोमय्या यांनी गंभीर आरोप केला आहे. मुंबई शहरातून 14 ते 17 वर्षे वयोगटातील मुली मोठ्या प्रमाणावर गायब होत असून या प्रकरणी अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याचे सोमय्या यांनी म्हटले आहे.
दरम्यान, मानखूर्द पोलीस स्टेशन हद्दीतून 2, देवनार पोलीस स्टेशनमधून 4 मूली गायब झालेल्या आहेत. त्यालाच लागून असेलल्या शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीतून मात्र एकही मुलगी गायब झाली नाही, याकडे लक्ष वेधत याचा तपास करावा अशी मागणी सोमय्या यांनी केलेली आहे.