सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाची सीबीआय चौकशी करा – मुख्यमंत्री नितीश कुमार
पाटना – अभिनेता सुशांत सिंह राजपूतने जून महिन्यात मुंबईतील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यानंतर मुंबई पोलीस आत्महत्या का केली याचा तपास करत असतांना बिहार पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने आता या प्रकरणाला वेगवेगळी वळण मिळू लागली आहे. सुशांत सिंह याच्या आत्महत्या प्रकरणावरून मुंबई पोलीस आणि बिहार पोलीस यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू असून, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी हा प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याची शिफारस केली आहे.
सुशांत सिंह आत्महत्या करण्यात शंका तसेच अनेक प्रश्न निर्माण होत असल्याने मुंबई पोलिसांनील त्याचा तपास सुरू केला होता. सध्या बिहार पोलीसाचं एक पथक तपासासाठी मुंबईत दाखल झाले असून, सगळ्यांना मुंबई महानगर पालिकेने विलगीकरणात ठेवले आहे. त्यामध्ये एका आयपीएस अधिकाऱ्याचाही समावेश आहे. त्यामुळे बिहार पोलीस आणि मुंबई पोलीसात सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात बरेचसे वाद होतांना दिसत आहे.