breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

सावरकरांना भारतरत्न मिळावे म्हणून सर्वांनी प्रयत्न करूया, विधानसभेत अजित पवार यांचे आवाहन

मुंबई | महाईन्यूज

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मृतीदिनी त्यांच्या गौरवाचा प्रस्ताव सादर करण्यावरून आज विधानसभेत जोरदार गदारोळ झाला. एकीकडे सावकरांच्या गौरव प्रस्तावाची मागणी भाजपाने लावून धरली असताना विधानसभाध्यक्षांनी मात्र त्याला दाद दिली नाही. दरम्यान, सावरकरांचे योगदान कुणीही नाकारू शकत नाही असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सावरकरांना भारतरत्न मिळावे यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे विधान सभागृहात केले आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या गौरव प्रस्तावाची मागणी विरोधी पक्ष भाजपाने लावून घरली असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपाला प्रत्युत्तर दिले. ‘सावरकर यांनी दिलेले योगदान कुणीही नाकारू शकत नाही. त्यांनी मांडलेले काही मुद्दे विज्ञानवादी होते. सावरकरांविषयी मतमतांतरे असू शकतात. व्यक्ती तितकी मते आपल्याकडे असतात. मात्र म्हणून सावकरांचे योगदान नाकारता येत नाही,’ असे अजित पवार म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button