breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्र

सांगलीतील पुरातन वटवृक्ष वाचवण्यासाठी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा पुढाकार

सांगली । रत्नागिरी-कोल्हापूर- मिरज-सोलापूर या राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण करण्यात येत आहे. त्याचे काम प्रगतीपथावर आहे. मात्र, या मार्गावरील सुमारे ४०० वर्षांपूर्वीचा वटवृक्ष रुंदीकरणाच्या कामात हटवण्याच्या हलचाली सुरू आहेत. या वटवृक्षाला वाचवण्यासाठी आता राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी पुढाकार घेतला आहे.

याबाबत केंद्रीय भूपृष्ठ मंत्री नितीन गडकरी यांना पर्यावरण मंत्री ठाकरे यांनी निवेदन दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, मौजे भोसे, ता. मिरज, जि. सांगली येथील गट क्र. ४३६ मधील यल्लमा मंदिरासमोरील राष्ट्रीय महामार्ग क्र. १६६ च्या कामामध्ये येणारे सुमारे ४०० वर्षांपूर्वीचे पुरातन वृटवृक्ष वाचवला पाहिजे.

रत्नागिरी-कोल्हापूर-मिरज- सोलापूर या राष्ट्रीय महार्गामुळे परिसरातील शेतकरी बांधव, नागरिकांचा मोठा फायदा होणार आहे. हा महामार्ग मिरज ते पंढरपूर या शहरांदरम्यान मौजे भोसे या गावातून जातो. मौजे भोसे गावातील गट क्र. ४३६ येथे यल्लमा देवीचे पुरातन मंदिर असून, या मंदिरासमोरच सुमारे ४०० वर्षांपूर्वीचा महाकाय वटवृक्ष असून, त्याचा विस्तार जवळ-जवळ ४०० चौ. मी. इतका व्यापक आहे. हा वटवृक्ष त्या परिसरातील एक ऐतिहासिक ठेव तर आहेच. त्याचबरोबर ते वटवाघुळ आणि इतर दुर्मिळ पक्षी यांचेकरिता नैसर्गिक निवासस्थान देखील आहे. त्यामुळे नियोजित राष्ट्रीय महामार्ग क्र. १६६ च्या कामामुळे सदर पुरातन वटवृक्षास बाधा पोहोचत असलयाने वटवृक्ष तोडावे लागेल किंवा पर्यायी जागेवरुन रस्ता करावा लागेल, असे उपविभागीय अधिकारी, मिरज यांच्या अहवालातून नमूद केलेले आहे. त्यामुळे वटवृक्षाचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेता तसेच परिसरातल पर्यावरणाचा होणाऱ्या ऱ्हासाचा विचार करता मौजे भोसे येथील संबंधित जागेवरील महामार्गाचे संरेखन काही प्रमाणात बदलून वटवृक्षाचे जतन होण्याबाबत कार्यवाही करावी, अशी मागणी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button