breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शेतकऱ्यांना लुटणारे आता आक्रमक होतायेत; ‘बच्चू कडूंचे’ भाजपवर जोरदार टीकास्त्र

नागपूर | महाईन्यूज

शेतकरी कर्जमाफी आणि अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीवर विरोधीपक्ष भाजप विधीमंडळात आक्रमक झालेले आहेत. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी भाजपने आक्रमक पावित्रा घेत सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले आहे. त्यावर उद्धव ठाकरे यांच्यासह सत्ताधारी पक्षातील मंत्र्यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले आहे. तर अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी देखील भाजपला जबर टोला लागवला आहे.

आमदार बच्चू कडू यांनी सत्ताधारी महाविकास आघाडीला पाठिंबा दर्शविलेला आहे. शेतकरी प्रश्नांवरून सभागृहाचे कामकाज थांबल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर कडाडून टीका केलेली आहे. तर जयंत पाटील यांनी देखील राज्याचे पैसे तुमच्या केंद्रातील मोदी सरकारला द्यायला सांगा, असं म्हटलेले आहेत. यादरम्यान शेतकऱ्यांना मागील पाच वर्षे लुटणारे भाजप आक्रमक झाल्याचे पाहून आमदार बच्चू कडू यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. तसेच शेतकऱ्यांना लुटणारे आक्रमक होताना पाहून आपल्याला आनंद झाल्याचे कडू यांनी नमूद केले आहे. आता यावर भाजपची प्रतिक्रिया काय हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button