breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

“शिवसेनेसोबत सरकार स्थापन करणे म्हणजे काँग्रेसला जमिनीत गाडण्यासारखे”

राज्यात बिगरभाजप सरकार स्थापन करण्यापूर्वी किमान समान कार्यक्रम निश्चित करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस नेत्यांमधील बैठक बुधवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. सत्तासंघर्षांवर चर्चा सुरू असली तरी सत्तास्थापण्याबाबत मात्र दोन्ही काँग्रेसमध्ये शांतता दिसून आली. गुरुवारी सकाळीदेखील काँग्रेस कार्यकारिणीची बैठक पार पडली असून यावेळी बैठकीत एकसुत्री कार्यक्रम मांडण्यात आला. शिवसेनेसोबत सरकार स्थापन करण्यास काँग्रेस सकारात्मक असल्याचं चित्र आहे.

दरम्यान काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी पुन्हा एकदा शिवसेनेसोबत सरकार स्थापन करण्याला विरोध दर्शवला असून इशारा दिला आहे. शिवसेनेसोबत सरकार बनवणे म्हणजे काँग्रेस पक्षाला गाडण्यासारखे आहे असे संजय निरुपम यांनी म्हटले आहे. संजय निरुपम यांनी ट्विट करत आपली नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, “काही वर्षापुर्वी काँग्रेसने उत्तर प्रदेशात बसपासोबत आघाडी करत चूक केली होती. तेव्हा काँग्रेसला असा फटका बसला होता, ती आजपर्यंत उठू शकलेली नाही. महाराष्ट्रात पुन्हा ते तीच चूक करत आहेत. शिवसेनेच्या सरकारमध्ये तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष होणं म्हणजे काँग्रेसला जमिनीत गाडण्यासारखं आहे”. संजय निरुपम यांनी यावेळी काँग्रेस अध्यक्षांनी दबावात येता कामा नये असं मत व्यक्त केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button