breaking-newsमहाराष्ट्र

शिवसेनेचे नेते कुठेही डोकं लावतात – रावसाहेब दानवे

शिवसेनेचे लोक कुठेही डोकं लावतात असं म्हणत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेची खिल्ली उडवली. सरकारने कर्जमाफीची फसवी घोषणा केली असे निवेदन जिल्हाधिकार्‍यांना दिले, त्यावरूनच दानवे यांनी हा निशाणा साधला आहे.  शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी जिल्हाधिकारी उदय चौधरी यांना शुक्रवारी दुपारी १ वा., शेतकर्‍यांचे कर्ज माफ करावे.तसेच सरकारने कर्जमाफीच्या फसव्या घोषणा करुन जाहिरातबाजी केली आहे.शेतकर्‍यांची क्रूर चेष्टा चालवली आहे. अशा आशयाचे निवेदन दिले. या घटनेचा रावसाहेब दानवे यांनी चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले की,
राज्यातील ४१लाख शेतकर्‍यांना आतापर्यंत २४हजार २५० कोटी कर्जमाफी दिली आहे. राज्यशासन आणि राष्ट्रीयकृत बँका यांनी कर्जमाफीसाठी पात्र ठरवलेले हे शेतकरी आहेत. सरकार जनतेची कोणतीही दिशाभूल करंत नाही.आता फक्त १० टक्के पात्र शेतकरी राहिले आहेत.त्यांचीही कर्जमाफी लवकरच होईल म्हणून विरोधकांनी अभ्यास न करता अर्जफाटे करुन आपण जनतेसाठी काही करत आहोत हे दाखवण्याचे केवीलवाणे उद्योग बंद करावे असा खोचक सल्लाही त्यांनी दिला

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button