breaking-newsराष्ट्रिय
वादळी पावसाने केरळमध्ये केळी, मसाले पिकांचे नुकसान
नवी दिल्ली : मागील आठवड्यात झालेल्या वादळी वारे आणि पावसाने केरळमध्ये केळी आणि मसाले पिकांचे तर उत्तर प्रदेशात आंबा फळांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे.
अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केरळसोबतच उत्तर प्रदेश, राजस्थान आणि हरियाणा या राज्यांमध्ये देखील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, गहू आणि धान पिकातून मिळालेला फायदा आता या झालेले नुकसान भरून काढण्यात जाणार असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसणार आहे. या झालेल्या वादळी वाऱ्याने एकट्या उत्तर प्रदेशात सुमारे १०-२० टक्के आंबे गळून पडल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे येत्या काळात आंबा आणखी महागण्याची चिन्हे आहेत.