breaking-newsराष्ट्रिय
बटाटा साठ्यावर मर्यादा आणण्याच्या आदेशाला व्यापारी संघटनांचा आक्षेप
भुवनेश्वर : बटाट्याचा मोठ्या प्रमाणात साठा करण्याबाबत ओरिसा राज्य सरकारने आणलेल्या मर्यादेवर घाऊक व्यापाऱ्यांनी आक्षेप घेत त्याला योग्य भाव देण्याची मागणी केली आहे. यामुळे व्यापारी आणि राज्य सरकार यांच्यात संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे.
अन्न पुरवठा आणि ग्राहक मंत्रांनी कटक येथील घाऊक व्यापाऱ्यांसाठी बटाट्याची साठा मर्यादा ५०० क्विंटल इतकी ठेवली आहे. तर भुवनेश्वर, बेऱ्हामपूर, संभलपूर, पुरी आणि रौरकेला या शहरांसाठी ३५० क्विंटल इतकी साठा मर्यादा निर्धारित केली आहे.
राज्य सरकारने घेतलेला हा साठा मर्यादेचा निर्णय मागे घेतला नाही, तर आता इतर राज्यांमधून बटाट्याची खरेदी बंद करू, असा इशारा या त्रस्त झालेल्या व्यापाऱ्यांनी दिला आहे.