breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

लोकप्रिय ‘वंदे भारत एक्सप्रेस’ 15 ऑक्टोबरपासून धावणार

नवी दिल्ली– लॉकडाऊनमुळे गेल्या 6 महिन्यांपासून बंद असलेली नवी दिल्ली ते वैष्णवदेवी (कटरा, जम्मू काश्मीर) धावणारी लोकप्रिय वंदे भारत एक्सप्रेस परत सुरू करण्यात येणार असून येत्या 15 ऑक्टोबरपासून वंदे भारत एक्सप्रेस पुन्हा धावणार आहे.
ही एक्सप्रेस पुन्हा सुरु करण्यात यावी, अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून प्रवासी करत होती. त्यामुळे रेल्वे प्रवाशांना सुविधा देण्यासाठी वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यात येत असल्याचे मुख्य जनसंपर्क अधिकारी दीपक कुमार यांनी सांगितले. वंदे भारत एक्सप्रेस मंगळवार वगळता, इतर सर्व दिवशी सकाळी 6 वाजता नवी दिल्ली येथून प्रस्थान करेल. तर दुपारी 2 वाजता वैष्णवदेवी (कटरा, जम्मू काश्मीर) येथे पोहचेल. तसेच दुपारी 3 वाजता वैष्णवदेवी कटारा येथून निघेल. तर रात्री 11 वाजता दिल्लीला पोहोचणार आहे. या रेल्वेमुळे दिल्ली ते वैष्षवदेवीमधील अंतर 4 तासांनी कमी झाले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button