breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

लष्कराच्या तिन्ही दलांमध्ये समन्वय ठेवण्याची जबाबदारी- बिपीन रावत

नवी दिल्ली | महाईन्यूज

जनरल बिपीन रावत यांची केंद्र सरकारकडून संरक्षण प्रमुख म्हणून (चीफ ऑफ डिफेन्स) निवड करण्यात आली असून आज त्यांनी पदभार स्वीकारला आहे. पदभार स्वीकारल्यानंतर लष्कराच्या तिन्ही दलांमध्ये समन्वय ठेवण्याची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगतिले आहे. तसेच आम्ही राजकारणापासून नेहमी दूर आहे. आम्ही सरकारने दिलेल्या आदेशानुसार काम करतो असं बिपीन रावत यांनी स्पष्ट केलेलं आहे.

बिपीन रावत यांनी सुधारित नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीच्या विरोधात देशभरात सुरु असलेल्या आंदोलनावर भाष्य करत जे लोकांना चुकीच्या मार्गाने घेऊन जातात, ते नेते नसतात असं म्हटलेलं होतं. यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी राजकीय नेत्यांनी काय करायला हवे हे सांगण्याचे लष्कराचे काम नसल्याचे सांगत बिपीन रावत यांच्या विधानावर टीका केलेली होती. पी. चिदंबरम यांच्या टीकेवर सीडीएस बिपीन रावत यांनी आम्ही राजकारणापासून नेहमी दूर असतो असं सांगितलेलं आहे. बिपीन रावत यांनी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’चा (सीडीएस) पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button