breaking-newsराष्ट्रिय

राजधानीत पाच काश्मिरींना जमावाकडून मारहाण

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत सनलाइट कॉलनीमध्ये काश्मीरमधील पाच जणांच्या एका गटाला जमावाने बेदम मारहाण करण्याची घटना घडली असून पोलिसांनी त्याप्रकरणी चौकशी सुरू केली आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. मारहाण करण्यात आलेल्यांमध्ये चार महिलांचा समावेश आहे, या गटाला गुरुवारी रात्री ३०-४० जणांनी घेरले आणि मारहाण केली. काश्मीरचे असल्याने आपल्याला मारहाण करण्यात आली असा आरोप या गटाने केला आहे.

दरम्यान, हा सुनियोजित हल्ला होता, आरोपींच्या हातात हॉकीस्टिक होत्या, असे एका पीडिताने सांगितले. जमावाने आपल्याला घेरले आणि काश्मिरी दहशतवाद्यांना परत पाठविले पाहिजे, अशा घोषणा देण्यात आल्या. यापूर्वीही आपल्यावर हल्ला करण्यात आला होता. त्यामुळे आम्ही दहशतीच्या वातावरणात या वसाहतीमध्ये राहात आहोत, असेही पीडिताने सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button