breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

‘गुंडाचं सरकार आम्ही महाराष्ट्रात राहू देणार नाही’; आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा

मुंबई : रोशनी शिंदे मारहाण प्रकरणी आज महाविकास आघाडीने आज ठाण्यात मोर्चा काढण्यात आला. यावेळी आदित्य ठाकरे, जितेंद्र आव्हाड यांच्यासह प्रमुख नेते या मोर्चात सहभागी झाले होते. गुंडाचं सरकार आम्ही महाराष्ट्रात राहू देणार नाही, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

रोशनी शिंदे यांना मारहाण केली जाते हा अत्यंत घृणास्पद प्रकार ठाण्यात घडला आहे. आमचा लढा अन्यायाच्या विरोधात आहे. महिलांवर अत्याचार होत आहेत. ठाण्याचे पोलीस आयुक्त हे बेपत्ता आहे. गुंडांचं सरकार आलं आहे आम्ही ते सरकार महाराष्ट्रात राहू देणार नाही, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

मोर्चा किती भव्य आहे ते महत्वाचं नाही तर मोर्चा कशासाठी निघतोय ते महत्वाचं आहे. जो कायदा पोलिसांनी पाळला पाहिजे तो कायदा पायदळी तुडवला जातो आहे. आयपीएस होताना पोलीस शपथ घेतात की नि:पक्षपातीपणाने कारभार करेन. ते कधीही दिसतच नाही. एका समूहावर कायम अन्याय करण्याची प्रवृत्ती दिसते आहे. त्यामुळेच आम्ही हा मोर्चा काढला आहे, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button