breaking-newsमहाराष्ट्र

मुलाला ‘साहेब’ बनवण्याचं स्वप्न अधुरं, पेरणी करताना विजेच्या धक्क्याने बैलासह शेतकऱ्याचा मृत्यू

उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील बोर्डा येथील रामेश्वर मनोहर शेळके या शेतकऱ्याचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला.  पेरणी सुरु असताना शनिवारी(दि.29) ही दुर्देवी घटना घडल्याचं समोर आलं आहे. यामध्ये बैलासह शेतकऱ्याचा मृत्यू झाला.

रामेश्वर शेळके हे अल्पभुधारक शेतकरी आहेत. कुटुंबाचा गाडा हाकण्यासाठी शेतीसोबतच ते मजुरीचे कामही करतात. पावसाने हजेरी लावल्यामुळे पेरणीची लगबग सुरु होती. चार पैसे मिळावेत यासाठी बोर्डा येथीलच अनंत भगवान शेळके यांच्या शेतात बैलजोडीसह पेरणीच्या कामासाठी ते गेले होते. यावेळी ही दुर्घटना घडली. शेतात उभ्या असलेल्या विजेच्या खांबाला तारेचा आधार असतो. त्यामध्ये करंट उतरला होता. पेरणी सुरु असताना बैलाचा खांबाच्या तारेला स्पर्श झाला. यावेळी बैलाला वाचवण्यासाठी गेले असता. बैलासह त्यांचा मृत्यू झाला. रामेश्वर शेळके यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे. मुलगा आदित्य यावर्षी दहावीच्या वर्गात शिकत आहे. मुलाला खुप शिकवण्याची रामेश्वर यांची ईच्छा होती. त्याला चांगल शिकवायचं आणि साहेब करायचं अशी इच्छा ते बोलून दाखवत असत. मात्र या दुर्घटनेमुळे मुलाला साहेब करण्याचं त्यांचं स्वप्न अधुरचं राहिलं. रामेश्वर यांच्या अशा अकाली जाण्य़ाने कुटुंबाचं छत्र हरवलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button