breaking-newsमनोरंजन
‘मुंबईत येतेय, कोणाच्या बापात हिंमत असेल तर रोखा’- अभिनेत्री कंगना राणावत
मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत हिने मुंबई पाकिस्तानव्याप्त काश्मीरसारखी वाटत असल्याचे वक्तव्य केल्याने वाद निर्माण झाला आहे. तिच्यावर सर्वच स्तरातून जोरदार टीका होत आहे. यावर आता ट्विट करत कंगनाने ‘मी ९ सप्टेंबरला मुंबईत येतेय, कोणाच्या बापात हिंमत असेल तर रोखा’, अशा शब्दांत आव्हानच दिले आहे.
‘बरेच जण मला मुंबईला परत न येण्याची धमकी देत आहेत, म्हणून मी आता येत्या आठवड्यात ९ सप्टेंबरला मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला आहे. मी मुंबई विमानतळावर किती वाजता उतरणार याची वेळ पोस्ट करेन. कोणाच्या बापात हिंमत असेल तर रोखा’, असे ट्विट कंगनाने केले आहे.