breaking-newsमनोरंजन

‘मुंबईत येतेय, कोणाच्या बापात हिंमत असेल तर रोखा’- अभिनेत्री कंगना राणावत

मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत हिने मुंबई पाकिस्तानव्याप्त काश्मीरसारखी वाटत असल्याचे वक्तव्य केल्याने वाद निर्माण झाला आहे. तिच्यावर सर्वच स्तरातून जोरदार टीका होत आहे. यावर आता ट्विट करत कंगनाने ‘मी ९ सप्टेंबरला मुंबईत येतेय, कोणाच्या बापात हिंमत असेल तर रोखा’, अशा शब्दांत आव्हानच दिले आहे.

‘बरेच जण मला मुंबईला परत न येण्याची धमकी देत ​​आहेत, म्हणून मी आता येत्या आठवड्यात ९ सप्टेंबरला मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला आहे. मी मुंबई विमानतळावर किती वाजता उतरणार याची वेळ पोस्ट करेन. कोणाच्या बापात हिंमत असेल तर रोखा’, असे ट्विट कंगनाने केले आहे.

https://twitter.com/KanganaTeam/status/1301782810261299200?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1301782810261299200%7Ctwgr%5Eshare_3&ref_url=http%3A%2F%2Fenavakal.com%2Fe0a495e0a482e0a497e0a4a8e0a4be-e0a4aee0a58de0a4b9e0a4a3e0a4a4e0a587-e0a4aee0a581e0a482e0a4ace0a488e0a4a4-e0a4afe0a587e0a4a4e0a587%2F
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button