breaking-newsक्रिडा
भारताच्या पहिल्या दिवस-रात्र कसोटीला अमित शाहांची उपस्थिती
भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील २ कसोटी सामन्यांच्या मालिकेला गुरुवारी इंदूरच्या मैदानात सुरुवात झाली आहे. या मालिकेतला दुसरा सामना हा भारतीय संघासाठी महत्वाचा आहे. सौरव गांगुलीने बीसीसीआय अध्यक्षपदाची सुत्र हाती घेतल्यानंतर संघटनेत अनेक बदल होताना दिसत आहेत. काही वर्षांपासून दिवस-रात्र कसोटी सामन्यांना नकार देणाऱ्या बीसीसीआयने अखेरीस यासाठी पुढाकार घेतला आहे. २२ नोव्हेंबरला कोलकात्याच्या इडन गार्डन्स मैदानावर हा सामना रंगेल.