breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

प्रलंबित प्रश्नावर मुख्यमंत्र्यासमेवत आमदारांची नागपुरात बैठक

पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरातील प्रलंबित प्रश्नाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध मंत्र्यासमवेत नागपुर अधिवेशनात शुक्रवारी (दि.20) बैठक घेण्यात येणार आहे. यामध्ये शहरातील बंदिस्त पवना जलवाहिनी प्रकल्प, आंद्रा, भामा आसखेड प्रकल्पासह अन्य प्रश्नावर सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे. 

या बैठकीस जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, बाळा भेगडे, आयुक्त श्रावण हर्डीकर याच्यासह विविध अधिकारी उपस्थित राहणार आहे.  याबाबत भोसरीचे आमदार महेश लांडगे म्हणाले की, पवना धरणातून बंद जलवाहिनीद्वारे पाणी आणण्याच्या प्रश्नांवर चर्चा करुन तोडगा काढण्यात येणार आहे. आंद्रा धरणातून 36.87 एमएलडी आणि भामा-आसखेड धरणातून 60.79 एमएलडी पाणीसाठा पिंपरी-चिंचवड शहरासाठी  देण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली होती. त्या बाबतचा फेरप्रस्ताव पालिकेने सादर केला आहे. जलसंपदा विभागाच्या अधिकार्‍यांसोबत एप्रिलमध्ये झालेल्या बैठकीतील चर्चेनुसार फेरप्रस्ताव तयार केला आहे. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या मानांकाप्रमाणे आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून शहराच्या लोकसंख्या वाढीचा दर प्रमाणित करून फेरप्रस्ताव केला आहे. त्यामुळे आंद्रा व भामा-आसखेड धरणांतील पाण्याचे आरक्षणाचे पुन:आरक्षण करण्यात यावे, अशी विनंती पालिकेने केली आहे.

महापालिकेने मुदतीमध्ये जलसंपदा विभागाकडे रक्कम जमा न केल्याने आरक्षण रद्द झाले आहे. धरण पुर्नस्थापनेसाठी 200 कोटी रूपये देण्यास पालिका तयार आहे. मात्र, धरणग्रस्त पुनवर्सनासाठीची रक्कम त्यातून वळती करण्याची मागणी पालिकेची आहे. धरणग्रस्त पुनर्वसनासाठीची सुमारे 270 कोटी रूपये रक्कम आहे. तसेच, आंद्रा धरणातून सोडलेले पाणी इंद्रायणी नदीतील देहू बंधारा येथून घेण्यास अद्याप जलसंपदा विभागाची मान्यता मिळालेली नाही. तसेच, पवना धरणातून बंद जलवाहिनी योजना प्रलंबित असून, त्यावरही बैठकीत चर्चा होणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button