पाकव्याप्त जर देशात असेल तर हे मोदींचे पाप, आमचे नाही – उध्दव ठाकरे
मुंबई – शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यात शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला टार्गेट केलं. आत्तापर्यंत जे बोललो नाही ते सर्व आज बोलणार आहे. मी संयम राखण्याचा प्रयत्न करणार आहे. मात्र बोलण्यात काही कमी जास्त झालं तर लगेच मुख्यमंत्री असं बोलले म्हणून ओरडू नका असंही ते म्हणाले. आपल्या सर्व भाषणात त्यांनी भाजपला टार्गेट केलं. महाराष्ट्राला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे असा आरोपही त्यांनी केला.
ज्यांना आमच्याशी टक्कर द्यायची खुमखुमी असेल त्यांनी अंगावर यावं आम्ही त्यांना दाखवून देऊ असं थेट आव्हान उद्धव ठाकरे यांनी भाजपचं नाव न घेता दिलं. हिंदुत्वाची व्याख्या आम्हाला सांगणाऱ्यांनी मोहन भागवत यांनी दिलेलं भाषण ऐकावं असंही त्यांनी भाजपला सुनावलं.
उद्धव ठाकरे म्हणाले…
सरसंघचालक यांनी सांगितलेले हिंदुत्व मानता की नाही? सरसंघचालक सांगतात हिंदुत्व हे पूजेपर्यंत मर्यादित हिंदुत्व नाही, मंदिर उघडे करा म्हणतात. टोप्या नका घालू विनाकारण काहीही सांगून असा निशाणाही त्यांनी भाजपला लगावला.
सरसंघचालकांनी सांगितलेलं आणि आमचं हिंदुत्व हे सारखेच आहे. त्यांच्याकडून काही तरी शिका नुसतं टोप्या घालायला शिकू नका.
आपल्या संपूर्ण भाषणात उद्धव ठाकरे यांनी भाजपला टार्गेट केलं. कंगणा राणौतवरही त्यांनी जोरदार टीका केली. मुंबईला पाकव्याप्त काश्मीर म्हणणे हे पंतप्रधान मोदींचा अपमान आहे असंही ते म्हणाले.
सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येप्रकरणी महाराष्ट्रावर, शिवसेनेवर, ठाकरे कुटुंबीयांवर जे आरोप केले ते महाराष्ट्राला बदनाम करणारं आहे. शेण खाऊन त्यांनी आमच्यावर गोमुत्राच्या गुळण्या केल्या तो सगळ्या जगाने पाहिलं असंही ते म्हणाले.
मुंबई, शिवाजी पार्क सगळीकडे चरस गांजा पिकला अस चित्र काही निर्माण केले, आमच्या घरासमोर तुळशीवृंदावन असते. गांजाची शेती तुमच्याकडे असते. मुंबई महाराष्ट्र पोलिस दल अभिमान आहे. केवळ महाराष्ट्र पुढे जातो म्हणून बदनाम केले जाते.
पाकव्याप्त हे जर देशात असेल तर पीएम यांचे पाप, आमचे पाप नाही. एकाने आत्महत्या केल्यानंतर बिहार पूत्र गेला म्हणून गळे काढले जात आहेत. गळे काढणारे महाराष्ट्र सरकार, ठाकरे कुटुंबीय, आदित्य यावर आरोप केले, गोमूत्र शेणाने गुळण्या केल्या नंतर काय झालं.