देशात 24 तासांत देशात 86 हजार 508 नव्या कोरोना रुग्णांची नोंद
नवी दिल्ली – भारतातील कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. देशभरातील एकूण कोरोनाबाधितांच्या संख्येने 57 लाखांचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे चिंता आता प्रचंड वाढली आहे. मागील 24 तासांत देशात 86 हजार 508 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली, तर 1 हजार 129 कोरोना रुग्णांनी आपला जीव गमावला. यासह भारताची एकूण कोरोनाबाधितांची संख्या 57 लाख 32 हजार 519 वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा 91 हजार 149 इतका झाला आहे. तसेच देशात आतापर्यंत 46 लाख 74 हजार 988 व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे, तर सध्या 9 लाख 66 हजार 382 जण कोरोनावर उपचार घेत आहेत.
दरम्यान, देशातील 7 राज्यांमध्ये कोरोनाची अधिक प्रकरणे समोर येत आहेत. यात महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, पंजाब आणि दिल्लीचा समावेश आहे. त्यामुळे याठिकाणी कोरोनाचे नियम पाळणे आणि विशेष काळजी घेणे महत्त्वाचे आहे.