breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

#Covid-19: चिंताजनक! देशात कोरोनामुळे आतापर्यंत 91 हजारहून अधिक लोकांचा मृत्यू

मुंबई: देशात कोरोनाचे नव्यानं संसर्ग होणाऱ्यांची संख्या जरी वाढत असली तरी सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात ही आकडेवारी थोडी कमी असल्याचं आणि रिकव्हरी रेट चांगल्या असल्याचं पाहायला मिळत आहे. गुरुवारी केंद्रीय मंत्रालयाकडून आलेल्या नवीन आकडेवारीनुसार 24 तासांत 86 हजार 506 लोकांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आलेला असून देशात आतापर्यंत कोरोनाचा आकडा 57 लाखावर पोहोचलेला आहे. या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जवळपास 90 आणि त्यानंतरच्या आठवड्यात 97 हजारापर्यंत दिवसाला रुग्ण वाढत होते.

मात्र आज हा आकडा कमी असून केवळ 86 हजार 506 नवीन लोकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेले आहेत. दरम्यान देशात सध्या 9 लाख 66 हजार 382 कोरोनाग्रस्त रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. देशात कोरोनामुळे 24 तासांत 1, 129 रुग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यंतही संख्या 91 हजार 149 वर पोहोचलेली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button