breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

डब्ल्यूएचओच्या मुख्य संशोधक डॉ. सौम्या स्वामिनाथन

कोरोनापासून बचावाचा जगभरात प्रयत्न केला जाताेय. दररोज नवनवीन उपायांवर चर्चा केली जातेय. कोरोनाची लस कधी येणार? सध्याची वापरातील आैषधी किती प्रभावी? लसीच्या आणीबाणीतील वापरास परवानगी देणे कितपत सुरक्षित ठरेल? विषाणू किती दिवस त्रस्त करेल? इत्यादी प्रश्नांबाबत ‘भास्कर’ने जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य संशोधक डॉ. सौम्या स्वामीनाथन यांच्याशी संवाद साधला. या चर्चेचे प्रमुख अंश असे-

जगात सध्या तरी कोरोना विषाणूच्या तीव्रतेत बदल झाल्याचे कोठेही दिसले नाही. आताही विषाणू आधीसारखाच आहे. त्याचा हवामानाशी संबंध नाही. सुरुवातीला जास्त मृत्यू होत होते. आता कमी होत आहेत. कारण उपचाराची पद्धत लक्षात आली नव्हती. रुग्णांना व्हेंटिलेटरवर जास्त ठेवले गेले. त्यामुळे इटली, अमेरिकेतील न्यूयॉर्कसारख्या ठिकाणी मृत्युसंख्या जास्त होती. आता उपचाराची पद्धत लक्षात येत आहे. म्हणून मृत्यूमध्येही घट झाली.

अनेक देशांत लसीची चाचणी दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात आहे. असे असले तरी लस येण्यास ६ ते ८ महिने लागू शकतात. कारण लसीच्या सुरक्षिततेची पडताळणी होणे गरजेचे आहे. अन्यथा धोकादायक ठरू शकतो.

लसीला तिसऱ्या टप्प्यातील चाचणीदरम्यान आणीबाणीच्या स्थितीत वापराची परवानगी जोखमीची ठरेल? आणीबाणीच्या स्थितीत चाचणीदरम्यान लसीच्या वापराची परवानगी कोणताही देश देऊ शकतो. त्यासाठी डब्ल्यूएचआेने मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. भारत सरकारच्या सीडीएससीआेला याबाबत निर्णय घ्यायचा आहे. आणीबाणीत परवानगी देण्यापूर्वी दोन टप्प्यांतील सर्व पैलूंचे परिणाम बारकाईने जाणून घेतले पाहिजेत, अन्यथा हानी होऊ शकते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button