breaking-newsराष्ट्रिय

जैश आणि लष्कर ए तैयबाची भारताविरुद्ध हातमिळवणी – कटकारस्थाने सुरू

नवी दिल्ली – जैश ए मोहम्मद ही दहशतवादी संघटना भारताविरुद्ध गरळ ओकण्याची एकही संधी सोडत नाही. दहशतवाद्यांची भरती करण्याचे कामही ती सतत करत असते, आता पाकिस्तानातील दुसरी एक दहशतवादी संघटना लष्कर ए तैयबाबरोबर हातामिळ्वणी करून भारताविरुद्धच्या कारवाया अधिक जोरदार करण्याची योजना जैश ए मोहम्मद करणार असल्याचा खुलासा आशिक बाबा या दहशतवाद्याने दिली आहे.

आशिक बाबा या दहशतवाद्याला नोव्हेंबर 2016 मध्ये जम्मू-काश्‍मीरमधील नगरगोटा छावणीवर हल्ल्याच्या संदर्भात पकडण्यात आले आहे. या हल्ल्यात आठ जवान शहीद झाले होते. आशिक बाबाने जैश आणि लष्कर ए तैयब यांच्या हातमिळवणी बद्दल माहिती उघड केली आहे. जैशच्या मुफ्ती वकासने सन 2017 मध्ये पुलवामा पोलीसलाईनमधील दहशतवादी हल्ल्याचे नेतृत्त्व केले होते, या हल्ल्यात 8 जवान शहीद झाले होते.

या हल्ल्यातील तीन दहशतवादी आशिक बाबा, तारीक अहमद दार आणि मुनीर अल हसन कादरी सतत मुजफ्फराबादमधील मौलाना मुफ्ती अशगर यांनी यांच्या सतत संपर्कात होते. त्यांचा संपर्क व्हाट्‌स ऍपवरून चालू होता. मुफ्तीचा भाचा वकास जैश ए मोहम्मदचा कमांडर होता. तो पुलवामा चकमकीत सुरक्षा दलांकडूना मारला गेला होता.
आशिक बाबा स्वत: चार वेळा काश्‍मीरला जाऊन आलेला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button