breaking-newsमहाराष्ट्रमुंबई
जागा दिली नाही तर नुकसान -आठवले
लोकसभा निवडणुकीसाठी झालेल्या युतीमध्ये आम्ही सहभागी आहोत. मात्र रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला निवडणुकीत दोन जागा मिळायला हव्यात. आम्हाला गृहीत धरून आमच्यावर अन्याय करू नका अन्यथा नुकसान सहन करावे लागेल, असा इशारा रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी मंगळवारी उल्हासनगर येथे बोलताना दिला. मात्र युतीसोबत असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला. दक्षिण मध्य मुंबई, ईशान्य मुंबई तसेच सोलापूर, रामटेक या मतदारसंघात रिपाइंची ताकद आहे. यापैकी दोन मतदारसंघ पक्षाला मिळावेत, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली होती. मात्र त्यावर अद्याप काहीही झालेले नाही.