breaking-newsराष्ट्रिय
गायींची तस्करी केल्याच्या आरोपावरून राजस्थानमध्ये एकाची हत्या
जयपुर – राजस्थानच्या अल्वार जिल्ह्यात एका 28 वर्षीय इसमाची त्याने गायींची तस्करी केल्याच्या संशयावरून जमावाने ठेचून हत्या केली. अकबर खान असे ठार झालेल्या इसमाचे नाव आहे. तो हरियानातील कोलगावचा रहिवासी होता.तो दुसऱ्या एका इसमासह जंगलातून दोन गायी घेऊन जात होता त्यामुळे जमावाने त्याच्यावर हल्ला करून त्याला ठार मारले असे सांगण्यात येते.
त्यावेळी अकबरखान याच्या बरोबर असलेला इसम मात्र पळून जाण्यात यशस्वी झाला आणि खान मात्र जमावाच्या तावडीत सापडला. या प्रकरणी अज्ञात इसमांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.