breaking-newsराष्ट्रिय

काश्‍मीरातील दहशतवाद नष्ट करणे हेच आमचे उद्दीष्ठ – राजनाथ

लखनौ – काश्‍मीरातील दहशतवाद नष्ट करून तेथे कायम स्वरूपी शांतता प्रस्थपित करणे हेच आमचे तेथील प्रमुख उद्दीष्ठ आहे असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी म्हटले आहे. भाजपने तेथील पीडीपी सरकारचा पाठिंबा काढून घेण्याचा निर्णय इतक्‍या तातडीने कसा घेतला असा प्रश्‍न पत्रकारांनी त्यांना विचारला होता त्यावर त्यांनी हे उत्तर दिले. तथापी यावर त्यांनी कोणतेही अधिक भाष्य करण्याचे टाळले.

काश्‍मीरात आता पीडीपी बरोबर सरकार चालवणे अशक्‍य झाल्यानेच आम्हाला हा पाठिंबा मागे घेण्याचा निर्णय घ्यावा लागत आहे असे भाजपचे सरचिटणीस राममाधव यांनी कालच स्पष्ट केले आहे. त्या राज्यात आता राज्यपाल राजवट लागू करण्यात आली आहे या साऱ्यांमागील कारण स्पष्ट करताना गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी तेथील दहशतवाद नष्ट करणे हा सरकारचा मुख्य हेतू असल्याचे म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button