काँग्रेसकडून आमच्या जीवाला धोका, बंडखोर आमदारांची संरक्षणासाठी पोलिसांकडे मागणी
मुंबई – कर्नाटकातील बंडखोर आमदारांचे बंड अजून सुरुच आहे. मुंबईत थांबलेल्या कर्नाटकच्या बंडखोर आमदारांनी काँग्रेसच्या नेत्यांकडून जीवाला धोका असल्याची भीती व्यक्त केली. मुंबई पोलिसांना संरक्षणाची मागणी करणारे पत्र दिले आहे.
Mumbai: 14 rebel K'taka MLAs write to Sr Police Inspector, Powai Police Station. Write '…we've absolutely no intentions in meeting Mallikarjun Kharge, GN Azad or any Congress dignitaries from Maharashtra&K'taka or any political leader as we anticipate serious threat from them.' pic.twitter.com/RfI2Jt6d6D
— ANI (@ANI) July 14, 2019
कर्नाटकात सत्ता संघर्ष सुरुच आहे. सरकार वाचविण्यासाठी जनता दल (एस) आणि काँग्रेसने शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत. बंडखोर आमदार आपल्या राजीनाम्यावर ठाम असल्याचे दिसून येत आहे.
मुंबईतील पवईमधील हॉटेलमध्ये 14 बंडखोर आमदार वास्तव्यास आहेत. या बंडखोर आमदारांनी पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना पत्र लिहिले आहे. यामध्ये काँग्रसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे, गुलाम नबी आझाद यांच्यासह अन्य कोणत्याही महाराष्ट्र आणि कर्नाटकातील नेत्यांशी आम्ही चर्चा करणार नाही. आम्हाला त्यांच्यापासून धोका निर्माण होण्याची शक्यता आहे, असे या बंडखोर आमदारांनी म्हटले आहे.
दरम्यान, कर्नाटकातील बंडखोर आमदारांच्या राजीनाम्यावर येत्या मंगळवारपर्यंत निर्णय घेऊ नका, असा आदेश सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना दिला आहे. जनता दल (एस) आणि काँग्रेसच्या आमदारांनी विधानसभा अध्यक्ष आमचे राजीनामे मंजूर करण्यास नियमबाह्य पद्धतीने टाळाटाळ करत असल्याच आरोप करत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवरील सुनावणी दरम्यान बंडखोर आमदारांच्या राजीनाम्यावर येत्या मंगळवारपर्यंत कोणताही निर्णय घेऊ नका, असा आदेश सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना दिला आहे. त्यामुळे आता या प्रकरणाची पुढील सुनावणी मंगळवारी 16 जुलैला होणार आहे.