breaking-newsमहाराष्ट्रराष्ट्रिय

आम्ही सत्तेत येणार नाही, याची खात्री होती, म्हणून जनतेला दिली मोठ-मोठी आश्वासने- गडकरी

मुंबई: केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी एका खाजगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये खळबळजनक वक्तव्य केले आहे. “आम्ही सत्तेत कधीच येणार नाही याची आम्हाला खात्री होती. त्यामुळे आम्हाला मोठी मोठी आश्वासने देण्याचा सल्ला दिला होता.” गडकरींच्या या विधानामुळे भाजपची चांगलीच गोची झाली आहे. विरोधकांनीही भाजपची खिल्ली उडवणे सुरु केले आहे. राहुल गांधी यांनी ट्विटरवर गडकरींची मुलाखत ट्विट केली आहे. ते म्हणाले “तुम्ही अगदी बरोबर बोलत आहात. जनताही आता असाच विचार करत आहे. की भाजपने त्यांच्या अपेक्षा आणि विश्वासाचा वापर पक्षाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी केला.

“गडकरी यांनी सिद्ध केले आहे. की भाजप सरकार जुमले आणि खोट्या आश्वासनांवर स्थापन झाले आहे’, असे काँग्रेसने स्पष्ट केले आहे.
काय म्हणाले होते नितीन गडकरी ?
“आमचा सगळ्यांचा एवढा एवढा दृढ विश्वास होता, इतका प्रखर आत्मविश्वास होता की आयुष्यात आम्ही कधी सत्तेवर येतच नाही. त्यामुळे आमच्या आजूबाजूचे लोक म्हणायचे बोला ना, सांगा ना, बिघडतंय काय ? फडणवीस काय बोलले जनता आम्हाला त्या आश्वासनांची आठवण करून देते. मात्र आम्ही सध्या त्यावर हसतो आणि पुढे निघून जातो” असे गडकरींनी सांगितले.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button