breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुलं लावारीस, भाजप प्रवक्ते बरळले
मुंबई – भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भगवान विष्णूचे अकरावे अवतार असल्याचा जावईशोध लावला होता. काही महिन्यांपूर्वी याबाबत ट्वीट करत वाघ यांनी मोदींना थेट देव करुन टाकले होते. आणि आता पुन्हा एकदा अवधूत वाघ यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुलं ही लावरीस असतात असं ट्विट केले आहे. यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटले आहे.
आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्याची मुले अनाथ म्हणजे लावारिस असतात बाबा…
हागणारा नाही तर बघणारा लाजातो https://t.co/XHOP9TIp9A
— चौकीदार Avadhut Wagh (@Avadhutwaghbjp) March 28, 2019
नेटिझन्सनी केले ट्रोल
अवधूत वाघ यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या बाबतीत केलेंले ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यांनी केलेल्या ट्विट मुळे नेटिझन्सनीं टिकेची झोड उठवत त्यांना चांगले ट्रोल केले आहे.