‘आता राज्य करायची बारी आमची’ बारामतीत झळकले पुन्हा फलक
पुणे |महाईन्यूज|
‘जेवढं राज्य करायचं होतं, तेवढं केलं आता राज्य करायची बारी आमची… महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा ऐंशी वर्षाचा पैलवान ठरवेल, तोच होणार, कारण कोणी कितीही उड्या मारल्या तरी सगळी सूत्रं इथूनच हलतात… साहेब…’ असे फलक उभारुन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना जोरदार प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यात जोरदार आरोप-प्रत्यारोप झाले होते. या पार्श्वभूमीवर बारामती शहरात पोस्टरमधून फडणवीसांवर टीकास्त्र सोडण्यात आलं आहे.
गेला महिनाभर सुरु असलेल्या सत्तासंघर्षावर अखेर तोडगा निघाला आणि या नाट्यमय घडामोडींनंतर आता शिवसेनेच्या नेतृत्वाखाली काँग्रेस-राष्ट्रवादी महाविकास आघाडीने सत्ता स्थापन केली आहे. महाविकास आघाडी स्थापन करण्यात शरद पवारांचा मोठा हात असल्यामुळे बारामतीकरांनी जल्लोष साजरा केला.