breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#CoronaVirus: देशात ५०० कोरोनाग्रस्तांचा मृत्यू

दिवसागणिक देशात करोना व्हायरसच्या रूग्णांची संख्या वाढतच चालाल आहे. मागील २४ तासांमध्ये दिल्ली, गुजरात, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रामध्ये करोनाग्रस्तांची संख्या वेगानं वाढली आहे. आतापर्यंत देशभरात रुग्णांची संख्या १५,७१२ इतका झाली आहे. तर, या आजारामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्याही ५०७ इतकी झाली आहे. तसेच, या जीवघेण्या आजारातून आतापर्यंत २२३० रुग्ण बरेही झाले आहेत. सध्या देशभरात १२९७४ जणांवर उपचार सुरू आहे.

करोना रुग्णांच्या मृत्यूंपैकी ७५ टक्के मृत्यू ६० वर्षांहून अधिक वयोगटांतील आहे. ८३ टक्के मृत्यूंमध्ये मधुमेहासारखा आजार असल्याचे आढळले आहे. ४२.२ टक्के मृत्यू ७५ वर्षांहून अधिक वयोगटांतील तर, ३३.१ टक्के मृत्यू ६०-७५ वयोगटांतील आहेत. १४.४ टक्के मृत्यू ४५ वर्षे वयोगटांतील रुग्णांचे असून १०.३ टक्के मृत्यू ४५-६० वयोगटांतील आहेत. देशातील २३ राज्यांमधील ४५ जिल्ह्य़ांमध्ये गेल्या १४ दिवसांत एकही नवा रुग्ण आढळलेला नाही. अशा जिल्ह्य़ांचा बिगर हॉटस्पॉट श्रेणीत (नारंगी श्रेणी) समावेश केला जातोय. पुढील १४ दिवसांमध्येही नवा रुग्ण न आढळल्यास हे जिल्हे करोनामुक्त मानले जातील. एकूण करोनाबाधितांपैकी ४२९१ रुग्ण (२९.८ टक्के) मरकज निजामुद्दिनशी निगडित आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button