breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

अनलॉक 4 मेट्रोबाबत निर्णय घेण्याची शक्यता; थिएटर आणि बारही उघडणार ?

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन घेण्यात आल होत. मात्र आता अनलॉकच्या एकेका टप्प्यात अनेक गोष्टी अनलॉक करण्यात आल्या आहेत. आता पर्यंत अनलॉक 3 मध्ये अनेक गोष्टींसाठी परवानगी देण्यात आली आहे. मात्र आता अनलॉक 4 मध्ये काय काय सुरु होणार याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे. मात्र अनलॉक 4 मध्ये केंद्र सरकार मेट्रोबाबत निर्णय घेण्याची शक्यता आहे. कोरोनाची देशातील परिस्थिती पाहून यावर अखेरचा निर्णय घेण्यात येणार आहे. त्याशिवाय, शाळा-कॉलेज उघडण्याबाबत अद्याप कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही. केंद्र सरकारने शाळा कॉलेज उघडण्याचा निर्णय राज्य सरकारवर सोपवल्याची माहिती आहे. त्याशिवाय, केंद्र सरकार थिएटर आणि बार उघडण्याबाबतही निर्णय घेण्याची शक्यता आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर जनजीवन आणि देशातील आर्थिक स्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी हळूहळू अनलॉकची प्रक्रिया राबवली जात आहे. आता जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी 1 सप्टेंबरपासून देशात अनलॉक 4 सुरु होणार आहे.

1 सप्टेंबरपासून थिएटर सुरु करण्याची परवानगी केंद्र सरकार देणार असल्याची माहिती आहे. मात्र, मॉल्समधील थिएटर उघडण्यास परवानगी दिली जाण्याची शक्यता कमी आहे. यासाठी माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी नव्या स्टँण्डर्ड ऑपरेटिंग प्रोसीजरची घोषणा केली आहे. त्याचप्रमाणे अनलॉक-4 मध्ये बारही उघडण्याची शक्यता आहे.मात्र, तिथे बसून मद्यपान करण्याची परवानगी देण्यात येणार नाही. तर, मुंबईतही 1 सप्टेंबरपासून बार उघडण्यासाठी परवानगी दिली जाण्याची शक्यता आहे.

दिल्लीमध्ये 1 सप्टेंबरपासून 15 दिवसांसाठी प्रायोगिक तत्त्वावर मेट्रो सेवा पुन्हा सुरु करण्यास परवानगी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर या काळात फक्त 50 प्रवाशांना मेट्रोच्या एका बोगीमध्ये प्रवेश करता येणार आहे. तर मुंबईतही 1 सप्टेंबरपासून मेट्रो पुन्हा धावण्याची शक्यता आहे. मुंबईमध्ये अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल सेवा सुरु करण्यात आलेली आहे. पण अद्याप अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांशिवाय इतरांना प्रवास करण्याची परवानगी देण्यात आलेली नाही.

त्याचप्रमाणे शाळा सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारवर सोपावण्यात आला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशातील शाळा-कॉलेज बंद आहेत. 1 सप्टेंबरपासून शाळा-कॉलेज सुरु करण्यास परवानगी मिळू शकते. मात्र, शाळा-कॉलेज सुरु करण्याचा महत्त्वाचा निर्णय केंद्र सरकारने राज्य सरकारकडे सोपवला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button