breaking-newsआंतरराष्टीय

पाकच्या कांगाव्याकडे जागतिक बँकेचे दुर्लक्ष

वॉशिंग्टन : सिंधू नदी पाणीवाटप करारावर भारताविरोधात कागाळ्या करणाऱ्या पाकिस्तानला जागतिक बँकेबरोबर कोणताही करार करण्यामध्ये अपयश आले आहे. किशनगंगा जलविद्युत प्रकल्पाच्या उद्घाटनानंतर या कराराचा भंग झाल्याचा आरोप करून, पाकिस्तानने जागतिक बँकेचे दरवाजे ठोठावले होते. मात्र, दोन दिवसांच्या चर्चेनंतरही त्यावर सहमती झाली नसल्याचे जागतिक बँकेने स्पष्ट केले.

अॅटर्नी जनरल अश्तर असफ अली यांच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानच्या शिष्टमंडळाने सोमवार आणि मंगळवारी जागतिक बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली. यामध्ये कराराचा भंग होत असल्याबद्दल पाकिस्तानकडून वेगवेगळ्या पद्धतीने युक्तिवाद करण्यात आला. मात्र, त्याविषयी कोणताही निष्कर्ष निघाला नाही असे जागतिक बॅंकेकडून सांगण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button