breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

युतीबाबत शिवसेनेने चर्चेची तयारी दाखवावी – रावसाहेब दानवे

  • समविचारी पक्षाला सोबत घेणार
  • तोपर्यंत सर्वच लोकसभा मतदार संघात कार्याचा आढावा घेणार

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी युती करण्याबाबत अद्याप भाजपचा फॉर्म्युला ठरलेला नाही. जोपर्यंत फॉर्म्युला ठरत नाही, तोपर्यंत आम्ही सर्वच लोकसभा मतदार संघातील पक्षाच्या कामाचा आढावा घेणार आहोत. युतीसाठी समविचारी पक्षाने आमच्यासोबत चर्चा करण्याची तयारी दाखवावी. त्यानंतर लोकसभेच्या त्यांच्या जागा त्यांना देण्याबाबत विचार होईल, असे आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी चिंचवड येथे केले.

गेली कित्येक “टर्म” मावळ आणि शिरूर लोकसभा मतदार संघावर शिवसेचेचे अधिराज्य कायम राहीले आहे. आता सत्तेत सोबत असुनही मित्र पक्षाच्या कुरापती सुरूच असतात. त्याला आगामी लोकसभा निवडणुकीत धडा शिकविण्यासाठी भाजपने लोकसभा मतदार संघनिहाय कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन पक्षकार्याचा आढावा घेण्याचे काम सुरू केले आहे. त्याच अनुषंगाने मावळ आणि शिरूर लोकसभा मतदार संघातील विधानसभा मतदार संघनिहाय कार्यकर्त्यांचा मेळावा वाल्हेकरवाडी येथील आहेर गार्डन येथे आज शुक्रवारी (दि. 26) पार पडला.

या मेळाव्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष दानवे यांनी पदाधिकारी, कार्यकर्त्यांना पुन्हा मोदींना पंतप्रधान करण्याची इर्षा मनाशी बाळगून कामाला लागण्याच्या सूचना दिल्या. व्यासपीठावर सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, महापौर राहुल जाधव, खासदार अमर साबळे, आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, बाळा भेगडे, विजय काळे, सुरेश हळवनकर, प्रशांत ठाकूर, बाबुराव पाचर्णे, सचिन पटवर्धन, आझम पानसरे, महापालिकेतील पक्षनेते एकनाथ पवार, उमा खापरे, तळेगावच्या नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांच्यासह मावळ आणि शिरूर लोकसभा मतदार संघातील पदाधिकारी उपस्थित आहेत.

दानवे म्हणाले की, आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये समविचारी मतांचं विभाजन होऊ नये, येवढीच आमची भावना आहे. त्यामुळे समविचारी पक्षाने आमच्याशी चर्चा करण्याची तयारी दर्षवावी. युतीबाबत अद्याप भाजपचा फॉर्म्युला ठरलेला नाही. तोपर्यंत आम्ही जागा वाटपाचा विचार न करता लोकसभा मतदार संघातील पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या कामाचा आढावा घेणार आहोत. मावळ आणि शिरूर मतदार संघात जरी मित्र पक्षाचे खासदार असले तरी याठिकाणी भाजपचे काम सध्या जोरात सुरू आहे. आणखीन काम वाढविण्यावर भर दिला जाणार आहे, असेही ते म्हणाले.

भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप म्हणाले की, मावळ आणि शिरुर मतदार संघातून आजपर्यंत भाजपला निवडणूक लढविण्याची संधी मिळाली नाही. आता येणाऱ्या निवडणुकीत भाजपचे कार्यकर्ते मावळ आणि शिरुर लोकसभा मतदार संघात आपली ताकद दाखवून देतील. पिंपरी-चिंचवड शहरात जे पिकते ते राज्यभर खपते. शहरातून राज्याची राजकीय हवा तयार होते. त्यामुळेच लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ पिंपरीतून फुटावा, अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा होती. त्यानुसार तीन नोव्हेंबरच्या सभेत प्रचाराचा नारळ फोडला जाणार आहे’, असेही ते म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button