breaking-newsराष्ट्रिय

दगडफेक करणाऱ्यांना गोळ्या घाला: भाजप खासदार

भिवानी : काश्मीरमध्ये लष्कराच्या जवानांवर दगडफेक करणाऱ्यांवरील गुन्हे मागे घेण्यात येत असल्याचे वाचनात आले; पण दगडफेक करणाऱ्यांना गोळ्या घातल्या पाहिजेत, असे खळबळजनक वक्तव्य भाजपचे राज्यसभेतील खासदार डी.पी.वत्स यांनी केले आहे. हरयाणातील भिवानी येथील एका कार्यक्रमात ते बोलत होते.

खासदार वत्स यांनी यावेळी पाकिस्तानवरही निशाणा साधला. भारताने पाकिस्तानला अनेकदा मात दिली आहे. राजकीय अपरिहार्यतेमुळे पाकिस्तानला काही वेळा ‘दया’ दाखवण्यात आली आहे. सध्या पाकिस्तानची अवस्था दयनीय आहे, असं ते म्हणाले. वैज्ञानिक दृष्टीकोन अवलंबल्यास आपल्या राज्याची आणि देशाची प्रगती होईल, असा सल्लाही त्यांनी उपस्थितांना दिला. खाप पंचायतींचंही त्यांनी कौतुक केलं. स्त्री-भ्रूण हत्या रोखण्याचे तसेच आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देण्याचे काम खाप पंचायतींनी केले आहे, असे त्यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button