breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशराजकारण

‘ज्ञानवापीला मशीद म्हटलं तर वाद होणारच..’; योगी आदित्यनाथ यांचं विधान

Yogi Adityanath : उत्तर प्रदेशातील काशी विश्वनाथ मंदिरातील ज्ञानवापी मशिदीचा मुद्दा सध्या चांगलाच चर्चेत आहे. सर्वेसाठी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. ३ ऑगस्टला हायकोर्ट यावर निर्णय देईल. या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एका मुलाखतीत मोठं विधान केलं आहे. तुम्ही ज्ञानवापी मशीद म्हटला तर वाद होणारच, असं योगी आदित्यनाथ म्हणाले.

योगी आदित्यनाथ म्हणाले की, आपण जर त्याला मशीद म्हटलं, तर वाद होणार. देवाने दृष्टी दिली आहे. त्यामुळे तुम्ही पाहू शकता, त्रिशूळ मशिदीत काय करतय? ज्योतिलिंग आहे, देवाच्या प्रतिमा आहेत. त्या भिंती काय सांगतायत? अशी ऐतिहासिक चूक झालीय, त्यावर तोडगा निघाला पाहिजे, असा प्रस्ताव मुस्लिम समाजातून आला पाहिजे.

हेही वाचा – केंद्र सरकारचा शेतकऱ्यांना दिलासा! पीक विम्यासाठी मिळाली ३ दिवसांची मुदत वाढ

योगी आदित्यनाथ यांच्या वक्तव्यावर २०२४ ची तयारी सुरू आहे. तिथे ३५० वर्षांपासून नमाज अदा केली जातेय, तर मशीद म्हणायच नाही, मग काय म्हणायचं? मुख्यमंत्र्यांनी अशी विधान करू नयेत. चौकशीत स्पष्ट होईल, तिथे काय आहे, असा डॉ. एसटी हसन यांनी प्रश्न वाचारला. यावर योगी आदित्यनाथ म्हणाले की, संसदेवर त्रिशूळ बनवलं, मग संसदेला मशीद म्हणायच का? मुस्लिमांनी नेहमी मोठं मन दाखवलय. बाबरीच्यावेळी सुद्धा असच झालं होतं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button