breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

केंद्र सरकारचा शेतकऱ्यांना दिलासा! पीक विम्यासाठी मिळाली ३ दिवसांची मुदत वाढ

मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांना केंद्र सरकारने मोठा दिलासा आहे. आता एक रुपयात पीक विमा भरण्यासाठी तीन दिवसांची मुदत वाढवली आहे. आज पीक विमा भरण्याची अंतिम तारीख होती. मात्र आता शेतकऱ्यांना ३ ऑगस्टपर्यंत पिक विमा हफ्ता भरता येणार आहे. याबाबतची माहिती कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी ट्वीट करत दिली आहे.

शेतकऱ्यांना काही दिवसापासून पंतप्रधान पीक विमा योजनेत सहभागी होताना अडचणी येत होत्या. काही तांत्रिक अडचणींमुळे पीक विमा भरता येत नव्हता. तर प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने शेवटची ताखील ३१ जुलै पर्यंत होती. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. त्यानंतर राज्यसरकारने केंद्र सरकारकडे पीक विमा संदर्भात मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने पीक विमा भरल्यास आता मुदतवाढ मिळाली आहे.

हेही वाचा – पुणे शहरातील सर्व शाळांना उद्या सुट्टी द्या, मनसेची मागणी; नेमकं कारण काय?

दरम्यान, आतापर्यंत दीड कोटी पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी विमा अर्ज भरले आहेत. तांत्रिक कारणांमुळे कोणत्याही शेतकऱ्याचा पीक विमा भरायचा राहू नये यासाठी ३ दिवसांची मुदत वाढवण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button