पितृ पक्षात का केली जाते महालक्ष्मीची पूजा?
Pitru Paksha : पितृ पक्ष दरवर्षी भाद्रपदाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो आणि अश्विन महिन्याच्या अमावस्येच्या दिवसापर्यंत चालू असतो. पितरांच्या पूजेसाठी हा काळ खूप खास आहे. वास्तविक पितृ पक्षामध्ये कोणतेही शुभ कार्य करण्यास मनाई आहे. परंतु शास्त्रानुसार श्राद्ध पक्षादरम्यान एक असा दिवस असतो, जो उपवास आणि लक्ष्मीची पूजा करण्यासाठी शुभ मानला जातो. याला गजलक्ष्मी व्रत किंवा महालक्ष्मी व्रत असेही म्हणतात.
या दिवशी हत्तीवर स्वार झालेल्या देवी लक्ष्मीच्या गजलक्ष्मी रूपाची पूजा केली जाते. असे म्हणतात की श्राद्ध पक्षातील अष्टमी तिथीला देवी लक्ष्मीची पूजा केल्याने घरामध्ये आशीर्वाद प्राप्त होतात आणि देवी लक्ष्मीची कृपा लोकांवर कायम राहते.
हेही वाचा – महाराष्ट्रात मृत्यूतांडव सुरूच; नागपुरात २४ तासांत २५ रुग्णांचा मृत्यू
शास्त्रानुसार श्राद्ध पक्षातील अष्टमी तिथीला महालक्ष्मी पूजनाचे विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की आदिशक्तीचे लक्ष्मी रूप या दिवशी पृथ्वीवर आपली यात्रा समाप्त करते. यानंतर नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून तिचा पुन्हा प्रवास सुरू होतो. पांडवांनी जुगारात सर्वस्व गमावल्यानंतर भगवान श्रीकृष्णाने युधिष्ठिरला हे व्रत पाळण्याचा सल्ला दिला असे मानले जाते.