छत्रपती शिवरायांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध : पंतप्रधान नरेंद्र मोदी
नवी दिल्ली | टीम ऑनलाइन
महाराष्ट्राचं अराध्य दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती साजरी होते आहे. अनेक ठिकाणी छत्रपती शिवरायांना वंदन केलं जातं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन केलं आहे. पंतप्रधानांनी छत्रपती शिवरायांना वंदन करतानाचा एक खास फोटो ट्विट केला आहे. छत्रपती शिवरायांचं कार्य हे कायम प्रेरणा देणारं आहे, मी त्यांना नमन करतो असंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.
काय म्हणाले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी?
‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना नमन करतो. त्यांचे अतुलनीय नेतृत्व आणि समाजकल्याणासाठी त्यांनी केलेलं कार्य पिढ्यानपिढ्या लोकांना प्रेरणा देत आहे. सत्य आणि न्यायाच्या मूल्यांसाठी उभे राहण्याच्या बाबतीत ते ठाम होते. त्यांचे ध्येय पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत’ असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
I bow to Chhatrapati Shivaji Maharaj on his Jayanti. His outstanding leadership and emphasis on social welfare has been inspiring people for generations. He was uncompromising when it came to standing up for values of truth and justice. We are committed to fulfilling his vision. pic.twitter.com/Oa3JLT0P67
— Narendra Modi (@narendramodi) February 19, 2022
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना नमन करतो. त्यांचे सर्वोत्कृष्ट नेतृत्व आणि समाज कल्याणासाठीचा आग्रह अनेक पिढ्यांसाठी प्रेरक ठरला आहे .सत्य आणि न्याय या मूल्यांशी त्यांनी तडजोड केली नाही. त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. pic.twitter.com/alPjOrLdT4
— Narendra Modi (@narendramodi) February 19, 2022
छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सगळ्या ठिकाणी साजरी केली जाते आहे. महाराष्ट्रात अत्यंत उत्साहाचं वातवरण आहे. औरंगाबादमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या 61 फुटी पुतळ्याचं थाटात अनावरण करण्यात आलं. शुक्रवारी रात्री 12 वाजता म्हणजेच 19 फेब्रुवारी ही तारीख लागल्यानंतर हा सोहळा पार पडला. पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंनी या पुतळ्याचं अनावरण केलं. औरंगाबादच्या क्रांती चौकात हातात भगवे झेंडे घेऊन असंख्य कार्यकर्ते जमले होते. औरंगाबादचा क्रांती चौक जय भवानी जय शिवाजीच्या घोषणांनी क्रांतीचौक दुमदुमला होता. ढोलताशांचा गजर, आतशबाजी, लेझर शो अशा थाटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं.
महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी औरंगाबाद महापालिकेतर्फे तयार करण्यात आलेल्या छत्रपती शिवरायांच्या 61 फुटी पुतळ्याचं अनावरण केलं. या सोहळ्याला सर्वपक्षीय नेते हजर होते. तसंच असंख्य शिवप्रेंमीची या सोहळ्याला गर्दी झाली होती. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती औरंगाबादमध्ये अशा प्रकारे पहिल्यांदाच साजरी करण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जंयती निमित्ताने आयोजित करण्यात येणाऱ्या शिवज्योत दौडीत दोनशे जण आणि जन्मोत्सव सोहळ्याकरिता पाचशे जणांना उपस्थित राहता येईल. आरोग्य नियमांचे पालन करून, सर्वांच्या आरोग्याची आणि स्वच्छतेची काळजी घेत शिवछत्रपतींचा जन्मोत्सव सोहळ्याचे क्षण साजरे करावेत, असे आवाहनही शासनाकडून करण्यात आलं. शिवज्योत आणि जन्मोत्सव सोहळ्यातील उपस्थितीबाबत विशेष बाब म्हणून अनुमती देण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे सादर केला होता. त्यावर मुख्यमंत्री ठाकरे यांनी ही मान्यता दिली होती. तसे निर्देशही गृह विभागासह संबंधित यंत्रणांना देण्यात आले.