राज्यात पुढील ४ दिवस मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाचा इशारा
Maharashtra Rain : राज्यभरात मान्सून सक्रिय झाला आहे. मुंबई, कोकणासह पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रासह विदर्भात पावसाने हजेरी लावली आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने पुढील ४ दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
राज्यातील काही जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ तर काही जिल्ह्यांना ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. येत्या २६ सप्टेंबरपर्यंत मोसमी पावसाचा जोर कायम असणार आहे. राज्यातील सहा जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट दिला आहे. नाशिक, जळगाव, जालना, धुळे, नंदूरबार, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
हेही वाचा – गणेशाच्या तुटलेल्या दातामागचे कारण काय? तुम्हाला माहित आहे का?
पुण्यातील घाट माथ्यावर आज मुसळधार पावसाची शक्यता आहे तर कोल्हापूर, सातारा, सांगली भागातील घाट माथ्यावर उद्या आणि परवा मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.