राहुल नार्वेकरांचा निकाल अडचणीत येणार? सुप्रिम कोर्टाची शिंदे गटाच्या ४० आमदारांना नोटीस
मुंबई | विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नुकतंच शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर निकाल जाहीर केला आहे. यामध्ये त्यांनी खरी शिवसेना शिंदेंचीच असल्याचं म्हटलं. यानंतर ठाकरे गटाने थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. यावर आता सर्वोच्च न्यायालयाने आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटातील आमदारांना नोटीस बजावली आहे. या नोटिशीवर उत्तर देण्यासाठी दोन आठवड्यांचा कालावधी दिला आहे.
राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालाच्या विरोधात ठाकरे गटाने पुन्हा याचिका दाखल केली होती. त्यानंतर यावर सुनावणी घेत सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं की, तुम्ही उच्च न्यायालयातच जा, पण यासाठी बराच अवधी लागेल, असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गटाला नोटीस जारी करत असल्याचं म्हटलं. त्यानुसार एकनाथ शिंदे आणि त्यांच्या ३९ आमदारांना नोटीस जारी करण्यात आली. तसेच या आमदारांना दोन आठवड्यात त्यांचं म्हणणं सादर करण्यात सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे.
हेही वाचा – Ram Mandir | जाणून घेऊयात देशातील सर्वात मोठी ५ राम मंदिरं!
Supreme Court issues notice to Maharashtra Chief Minister Eknath Shinde and other MLAs of his group on a petition of Uddhav Thackeray faction of Shiv Sena challenging the order of Maharashtra Speaker on the dismissal of disqualification pleas against Chief Minister Eknath Shinde… pic.twitter.com/7T1gjTVYHq
— ANI (@ANI) January 22, 2024
दरम्यान आता शिंदे गटाच्या आमदारांनी या नोटीशीला उत्तर दिल्यानंतरच या प्रकरणाची सुनावणी कुठे करायची यासंदर्भात निर्णय घेतला जाईल. त्यामुळे राहुल नार्वेकरांच्या निकालाला आव्हान देणाऱ्या ठाकरे गटाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयातच सुनावणी होणार की हे प्रकरण सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालयात वर्ग करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
राहुल नार्वेकरांचा निकाल काय?
राहुल नार्वेकरांनी निकाल देताना भरत गोगावले यांची शिंदे गटानं शिवसेनेचे मुख्य व्हिप म्हणून केलेली नियुक्ती वैध ठरवली. त्यामुळे सुनील प्रभू यांनी उद्धव ठाकरेंन नियुक्त केलेले प्रतोद म्हणून बजावलेला व्हिप नार्वेकरांनी अवैध ठरवला. तसेच, भरत गोगावले यांनी बजावलेला व्हिपदेखील तांत्रिकदृष्ट्या अपूर्ण असल्याचं नमूद करत त्यांनी ठाकरे गटाच्या आमदारांनाही अपात्र ठरवण्यास नकार दिला.