गाडा मालकांसाठी आनंदाची बातमी! बैलगाडा शर्यतीला सुप्रमी कोर्टाचा हिरवा कंदील
मुंबई : राज्यातील बैलगाडा शर्यतीच्या परवानगीबाबत आणि तामिळनाडूतील जलीकट्टू संदर्भात आज सुप्रीम कोर्ट अंतिम निकाल दिला आहे. घटनापीठाने सुनावणीनंतर याबाबतचा निकाल राखून ठेवला होता. तामिळनाडूतील जलीकट्टू आणि महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे बैलगाडा प्रेमींसाठी ही आनंदाची बातमी आहे.
बैलगाडा शर्यतीवर बंदी नाही असा अंतिम निर्णय सुप्रीम कर्टोने दिला आहे. डिसेंबर २०२१ मध्ये सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीवरची बंदी हटवली होती. त्यानंतर निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिका कोर्टात दाखल करण्यात आल्या होत्या. त्यावर सुनावणी झाली असून आज अंतिम निकाल देण्यात आला आहे.
हेही वाचा – ‘..पण आमचे उद्धवजी राजे-महाराजांपेक्षा कमी नाहीयेत’; देवेंद्र फडणवीसांची टीका
निकाल देताना न्यायमुर्ती अनिरूद्ध बोस म्हणाले, जरी कायद्याने प्राण्यांशी संबंधित असलेल्या परंपरांना परवानगी दिली जाऊ शकते की नाही, हे ठरवण्यासाठी कायदेमंडळ योग्य आहे या आधारावर न्यायालयाने कार्यवाही केली असली, तरी ती कोणत्याही दंडात्मक कायद्याचे उल्लंघन करत असेल तर अशा परंपरांना परवानगी देता येणार नाही.