breaking-newsTOP Newsटेक -तंत्रताज्या घडामोडीदेश-विदेशराष्ट्रिय

‘चांद्रयान-३’ चं यशस्वी लँडिंग, आता पुढे काय? किती महत्व?

Chandrayaan-3 : ‘चांद्रयान-३’ चं चंद्रावर यशस्वी लँडिंग झालं आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरित्या सॉफ्ट लँडिंग करणारा भारत पहिला देश ठरला आहे. विक्रम लँडरमधून प्रज्ञान रोव्हर बाहेर आलं आहे. १४ दिवसांसाठी ही मोहीम चालणार आहे. रोव्हर विक्रम लँडरला जी माहिती पाठवेल ती विक्रम लँडर पृथ्वीवर पाठवणार आहे. मात्र आता पुढे काय होणार? वाचा सविस्तर..

‘चांद्रयान-३’ चं यशस्वी लँडिंग, आता पुढे काय?

१४ दिवस विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर हे काम करणार आहेत. कारण तोपर्यंत तिथे उन असणार आहे. १४ दिवसांनी मात्र या ठिकाणी अंधार होईल. अंधार झाल्यानंतर विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर या दोहोंचं काम थांबणार आहे. चंद्रावर जेव्हा परत सूर्य उगवेल त्यावेळी या दोन्हीचं काम पुन्हा सुरु होऊ शकतं. तसं घडलं तर भारतासाठी ती देखील आनंदाची बातमी ठरणार आहे.

हेही वाचा – ‘‘चांद्रयान- ३’’ च्या यशामुळे भारत अंतराळ संशोधनात बलशाली!

‘चांद्रयान-३’ पृथ्वीवर १४ दिवसांनी परत येणार का? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मात्र या प्रश्नाचं उत्तर नाही असं आहे. विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर हे दोन्हीही चंद्रावरच राहणार आहेत.

प्रज्ञान रोव्हर नेमकं काय कार्य करणार?

प्रज्ञान रोव्हर विक्रम लँडरच्या बाहेर आल्याचं ट्वीट इस्रोनेच काही वेळापूर्वी केलं आहे. प्रज्ञान रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागाची रासायनिक रचना कशी आहे ते तपासणार आहे. चंद्राची माती आणि खडक यांचं परीक्षणही करणार आहे. भारत हा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहचणारा पहिला देश ठरला आहे. त्यामुळे विक्रम लँडरमधून बाहेर आलेलं प्रज्ञान रोव्हर जो अभ्यास आणि निरीक्षण करेल ते संपूर्ण जगासाठी महत्त्वाचं असणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button