breaking-newsTOP NewsUncategorizedताज्या घडामोडीमुंबईराजकारण

शिवसेनेने मैदान राखले : विधान परिषद निवडणुकीत सचिन आहीर, आमश्या पाडवी विजयी

मुंबई : महाराष्ट्राच्या विधानपरिषदेच्या १० जागांवरील निवडणुकीसाठी मतदान पार पडलं. राज्यसभा निवडणुकीप्रमाणं या निवडणुकीत देखील भाजप आणि महाविकास आघाडीनं शक्ती लावली होती. विधानपरिषदेच्या १० जागांसाठी ११ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. भाजपनं प्रविण दरेकर,उमा खापरे, राम शिंदे, श्रीकांत भारतीय आणि प्रसाद लाड यांना उमेदवारी दिली होती. तर, शिवसेनेनं सचिन अहिर, आमश्या पाडवी, राष्ट्रवादी काँग्रेसनं रामराजे नाईक निंबाळकर, एकनाथ खडसे, काँग्रेसकडून भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे यांना उमेदवारी दिली होती. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे एकूण ११ उमेदवार असल्यानं निवडणूक लागली. भाजपचे प्रविण दरेकर,उमा खापरे, राम शिंदे, श्रीकांत भारतीय यांचा विजय झाला आहे. तर, शिवसेनेचे सचिन अहिर, आमश्या पाडवी विजयी झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे रामराजे नाईक निंबाळकर, एकनाथ खडसे विजयी झाले आहेत.

भाजपचे प्रविण दरेकर, उमा खापरे, राम शिंदे, श्रीकांत भारतीय हे पहिल्या फेरीत विजयी झाले. तर, शिवसेनेचे सचिन अहिर आणि आमशा पाडवी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे एकनाथ खडसे आणि रामराजे नाई निंबाळकर यांचा विजय झाला. काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे विजयी झाले आहेत.
काँग्रेसच्या तक्रारीनंतर मतमोजणी लांबली
भाजप आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्या मतदानावर काँग्रेसनं आक्षेप घेतला होता. काँग्रेसनं घेतलेला आक्षेप राज्य निवडणूक आयोगानं फेटाळला. त्यानंतर प्रकरण केंद्रीय निवडणूक आयोगाकडं गेलं. केंद्रीय निवडणूक आयोगानं देखील काँग्रेसचा आक्षेप फेटाळल्यानंतर मतमोजणीला सुरुवात झाली.

सचिन अहिर काय म्हणाले?
विधानपरिषद निवडणुकीच्या निकालाचं विश्लेषण केलं जाईल. महाविकास आघाडातील मित्रपक्षांना मत देण्याची भूमिका होती. शिवसेनेचे आमदार उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वात एकत्रित आहेत. शेवटचा निकाल आल्यानंतर या संदर्भातील प्रतिक्रिया देणं योग्य होईल, असं सचिन अहिर म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button