हत्येच्या आदल्या दिवशी आरोपी आंबेकर कोणाला भेटला? संजय राऊतांचा पुरावा सादर करत सवाल
शशिकांत वारिसे यांची हत्या हे एक षडयंत्र
मुंबई : पत्रकार शशिकांत वारिशे हत्या प्रकरणावरून महाराष्ट्रातीस राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. रत्नागिरीत नाणार येथे होणाऱ्या रिफायनरीला त्यांचा विरोध होता. याबाबतच्या अनेक बातम्या त्यांनी दिल्या होत्या. यातूनच शशिकांत वारिशे यांची हत्या करण्यात आली, असा संशय व्यक्त केला जात आहे. या हत्याप्रकरणावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
खासदार संजय राऊत यांनी शशिकांत वाशिरे प्रकरणासंबंधित एक ट्विट केलं आहे. यात त्यांनी म्हटलं आहे की, ही पंढरी आंबेरकरची गाडी, त्याच्या मागच्या बाजूस रिफायनरी कंपनी RRPCL चा लोगो आहे, ह्या कंपनीत ‘सौदी अरेबिया’च्या कंपनीची गुंतवणूक आहे. शशिकांत वारिसे यांची हत्या हे एक षडयंत्र आहे. आंबेकर अंगणेवडी जत्रेत हजर होता. अनेक नेत्यांना भेटला. नेते कोण?, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. दुसऱ्या दिवशी शशिकांत मारला गेला, असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, अंगणेवाडीच्या जत्रेच्या दिवशी भाजपने शक्तीप्रदर्शन करत जाहीरसभा आयोजित केली होती. या सभेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नारायण राणे हे देखील उपस्थित होते. यावरून खासदार संजय राऊत यांनी शशिकांत वाशिरे यांचा हत्येच्या आदल्या दिवशी आरोपी आंबेकर कोणाला भेटला? असा सवाल उपस्थित केला आहे.