breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशमहाराष्ट्रमुंबईराजकारण

हिंदू संस्कृतीत स्त्रीला मानाचे स्थान : सुधीर मुनगंटीवार

  • अखिल भारतीय आर्य वैश्य महिला महासभेच्या परिषदेची शिर्डीत सांगता

पिंपरी । महाईन्यूज ।

हिंदू संस्कृतीमध्ये स्त्रीला मानाचे स्थान आहे. देवांच्या मंत्रिमंडळामध्ये देखील विचार केला तर माता दुर्गेकडे संरक्षण खाते, अर्थ खाते श्री लक्ष्मीकडे तर शैक्षणिक खाते सरस्वतीकडे आहे; असे आपल्याला पाहायला मिळते. त्याप्रमाणे घराच्या उद्धारासाठी स्त्री अपरंपार कष्ट करते त्यामुळेच घर कुटुंब आणि देश यांची प्रगती साध्य होते, असे मत राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले.

अखिल भारतीय आर्य वैश्य महासभेच्या महिला आघाडी तर्फे शिर्डी येथे नुकतीच महिला महासभा परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी मुनगंटीवार बोलत होते. राष्ट्रीय अध्यक्षा माधुरी लक्ष्मीकांत कोले यांच्या संकल्पनेतून या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माधुरी कोले, अम्रावदी लक्ष्मीनारायण – अध्यक्ष फेडरेशन ऑफ ऑल इंडिया आर्य वैश्य महासभा, नंदकुमार गादेवार – अध्यक्ष महाराष्ट्र आर्य वैश्य महासभा, साथिया रमेश बाबू पाँडिचेरी अध्यक्षा, सुलभाताई वट्टमवार महाराष्ट्र राज्य अध्यक्षा, सुधा मूर्ती कर्नाटक राज्य अध्यक्षा, लक्ष्मी बालाजी तामिळनाडू राज्य अध्यक्षा, नालंम अंडल आंध्रप्रदेश राज्य अध्यक्षा, डॉ उपल्ला शारदा तेलंगाना राज्य अध्यक्षा, हृत्या वेंकट केरळ राज्य अध्यक्षा उपस्थित होते. ह्या सोबत आंध्र प्रदेश, केरळ, महाराष्ट्र, तेलंगणा, पाँडिचेरी, तामिळनाडू, आणि कर्नाटक या राज्यांतील महिला महासभा पदाधिकारी, आर्य वैश्य महासभेचे सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते.

मुनगंटीवार पुढे म्हणाले की, साईबाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शिर्डी मध्ये आपले अधिवेशन होत आहे. साईबाबांनी ‘श्रद्धा आणि सबुरी’ चा मूलमंत्र संपूर्ण जगाला दिला. त्याचा अंगीकार करत आर्य वैश्य महासभेने हाती घेतलेले कार्य करताना श्रद्धा आणि सबुरी ठेवून काम करत जावे. त्याचे निश्चितच चांगले फायदे समाजाला मिळतील, असा विश्वास मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

आपल्या स्वागत पर भाषणात माधुरी कोले यांनी परिषदेच्या आयोजनाचा उद्देश स्पष्ट केला. महिलांचे सक्षमीकरण, विचारांची देवाणघेवाण आणि प्रगतीसाठी ही परिषद महत्त्वपूर्ण ठरणार आहे, असे सांगितले. महिला सक्षमीकरण आणि शैक्षणिक प्रगतीसाठी आवश्यक प्रयत्न, जबाबदारी या विषयावरील परिसंवादात डॉ. रचीता बिडवई, सीमा निलावार, डॉ. प्रतिमा बंडेवार व डॉ. साधना चिद्रवार यांनी विचार मांडले. अम्रावदी लक्ष्मीनारायण, नंदकुमार गादेवार यांनी मनोगत व्यक्त केले.
लक्ष्मीकांत कोले, कार्यकारी संचालक, श्री बालाजी व्हॉल्व कंपोनेंट्स व अध्यक्ष, आर्य वैश्य कोमटी समाज श्री नग्रेश्वर देवालय पुणे हे ह्या परिषदेचे मुख्य प्रायोजक होते. यावेळी विविध राज्यातून आलेल्या महिला प्रतिनिधींनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडविले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button