रामदास आठवले यांचा शरद पवारांना सल्ला; म्हणाले, मोदींसोबत..
नरेंद्र मोदी हेच २०२४ ला पंतप्रधान होतील
मुंबई : अजित पवार यांनी राष्ट्रवादीतून बंड करत भाजप आणि शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे. यानंतर अजित पवार गटाकडून शरद पवार यांनाही भाजपसोबत येण्यासाठी आग्रह केला जात आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना सल्ला दिला आहे. ते नागपुर येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
रामदास आठवले म्हाणाले, शरद पवार यांनी देशहितासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत यायला हवे. राहुल गांधींच्या नादाला त्यांनी लागू नये, ‘इंडिया’ ही चुकीच्या वेळेला झालेली नकारात्मक आघाडी आहे. मी देखील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससोबत राहून पुन्हा राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये आलो. शरद पवार यांनी किमान समान कार्यक्रमावर एकत्र यायला पाहिजे.
हेही वाचा – ‘शिवीगाळ, धमकी देणाऱ्याला ब्राम्हण कसं म्हणायचं?’ छगन भुजबळ यांचा सवाल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात सर्व विरोधी गट एकत्र आले तरी २०२४ च्या निवडणुकीत इंडिया आघाडीचा टीकाव लागणार नाही. नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान होतील. अजित पवार महायुतीत आल्याने महाराष्ट्रात विधानसभेच्या दोनशेपेक्षा जास्त जागा जिंकू, असा विश्वासही रामदास आठवले यांनी व्यक्त केला.