राज्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत रामदास आठवले यांचं मोठं विधान; म्हणाले..
मुंबई : भाजप-शिवसेना यांच्यामध्ये एका बाजूला कल्याणच्या जागेवरून मतभेद सुरू आहेत. दरम्यान, आरपीआय गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राज्याच्या मंत्रिमंडळाबाबत शिंदे-फडणवीस सरकारकडे तीन मोठ्या मागण्या केल्या आहेत.
रामदास आठवले म्हणाले की, येत्या वसई विरार महापालिका निवडणुकीत भाजपाच्या मदतीने आम्हीही आमचे उमेदवार उभे करणार आहे. तसेच राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात आम्हाला एक मंत्रिपद मिळाले पाहिजे अशी मागणी ही रामदास आठवले यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
हेही वाचा – १ जुलैपासून ‘या’ कारच्या किंमतीमध्ये होणार १७,५०० रुपयांची वाढ
गेल्या काही दिवसांपूर्वी रामदास आठवले यांनी भाजपकडे तीन मोठ्या मागण्या केल्या आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रामदास आठवले यांनी मोठी मागणी केली होती. आगामी लोकसभा निवडणुकीत रामदास आठवले यांच्या रीपाई पक्षाला ३ जागा हव्या आहेत. तर विधानसभेसाठी रामदास आठवले यांनी १५ जागा मागितल्या होत्या, असंही रामदास आठवले म्हणाले.