Uncategorized

रजनीकांत यांचा अखेर राजकारणाला रामराम; ‘रजनी मक्कल मंद्रम’ पक्षही विसर्जित

मुंबई: राजांनीकांत यांनी सक्रिय राजकारणातून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला आहे. राजकारणात पुनरागमन करण्याची कोणतीही शक्यता नाही, असं स्पष्ट करतानाच रजनीकांत यांनी ‘रजनी मक्कल मंद्रम’ हा राजकीय पक्ष विसर्जित करण्यात येत असल्याची घोषणा केली आहे.‘रजनी मक्कल मंद्रम’ पक्ष्याच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर रजनीकांत यांनी हा निर्णय घेतला आहे. या २०१५ पूर्वीही मोदींनी रजनीकांत यांना भेटीसाठी आमंत्रित केले होते पण त्यांनी खाजगी कारण देत भेटीसाठी नकार दिला होता.

https://twitter.com/ANI/status/1414464372638830598?s=20

राजांनीकांत यांनीही स्थापन केलेला ‘रजनी मक्कल मंद्रम’ हा संपूर्ण पक्ष विसर्जित करण्यात येत आहे. यापुढे हा पक्ष कार्यरत राहणार नाही, अस्तित्वात राहणार नसल्याचं रजनीकांत यांनी स्पष्ट केलं. भविष्यात राजकारणात पुनरागमन करण्याची कोणतीही योजना नाही. मी राजकारणात येणार नाही, असं रजनीकांत यांनी स्पष्ट केलं. रजनीकांत यांनी हा निर्णय घेण्यापूर्वी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेतली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. या पुढे रजनीकांत राजकारणापासून अलिप्त राहणार असे बोलले जात आहे.

https://twitter.com/ANI/status/1414455359918379008?s=20

रजनीकांत यांनी गेल्यावर्षी एक चिठ्ठी लिहून त्यांची भूमिका जाहीर केली होती. मी राजकीय पक्ष सुरू करू शकत नाही, याचा मला खेद आहे. अत्यंत जड अंतकरणाने मी हा निर्णय घेत आहे, असं त्यांनी म्हटलं होतं. यावेळी त्यांनी कोरोनाचं कारणही पुढे केलं होतं. मी लोकांना भेटलो आणि कोरोना संक्रमित झालो तर माझ्या संपर्कात येणाऱ्या लोकांनाही संसर्ग होईल. त्यांनाही संघर्ष करावा लागेल. जीवनातील शांततेसह त्यांचं मोठं आर्थिक नुकसानाही होईल, असं रजनीकांत म्हणाले होते. त्यानंतररजनीकांत यांनी ‘रजनी मक्कल मंद्रम’ पक्षही विसर्जित करण्याचा निर्णय घेतला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button